‘१६ नाही तर ३९ आमदार अपात्र ठरणार’; ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान
![Anil Parab said that if not 16, then 39 MLAs will be disqualified](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/eknath-shinde-mla-780x470.jpg)
मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकालचं थोड्याच वेळात वाचन होणार आहे. आधी दिल्ली सरकारसंदर्भातल्या खटल्याच्या निकालाचं वाचन होणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकालाचं वाचन केलं जाणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
अनिल परब म्हणाले की, १६ आमदारांना अपात्र त्यावेळीचे विधानसभेच्या उपाध्यक्ष आणि तत्कालीन अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं आहे. त्याला हे आव्हान दिलं गेलं आहे. आमच्या दोन याचिका आहेत. एक १६ आमदारांची आहे आणि दुसरी २३ आमदारांची आहे. ज्यावेळी १६ आमदारांचा निकाल लागेल. तोत निकाल २३ आमदारांच्या बाबतीत लागू शकतो.
हेही पाहा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस
याबाबतची याचिका आधीपासूनच दाखल करण्यात आली आहे. ज्यावेळी याचा निकाल लागेल, त्यावेळी त्यांचीही प्रक्रिया सुरू होईल. साधारपणे अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार हा अध्यक्षांकडे असतो. मात्र स्वत: अध्यक्षच वादग्रस्त आहेत, अशा प्रकरणात अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये, असं नबाम रेबिया प्रकरणात म्हटलं आहे, असंही अनिल परब म्हणाले.